MAVAL TALKS NEWS
तळेगावकरांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात
कोकणात मुसळधार पावसामुळे अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी हे गावे, वस्त्यांमध्ये आणि तसेच शहरी भागात शिरले असल्यामुळे जनजीवन संपूर्ण विस्कळीत झाले आहे. योग्य ठिकाणी मदत पोहोचावी म्हणून आपण 72 तासाची प्रतीक्षा पूर्ण केलीये. आता कोकणातील नागरीकांना तात्काळ मदत करण्याची विनंती की दिनांक २५ जुलै रोजी दुपारी 3 वाजे पर्यंत जनसेवा थाळी मराठा क्रांती चौक तळेगाव स्टेशन येथे तळेगावकर नागरिकांनी विनंती करण्यात आली होती... या दरम्यान नागरिकांनी
कपडे, चादरी, खाण्याचे पॅकिंग पदार्थ, टूथ पेस्ट, पिण्याचे पाणी ,
बेडशीट , चादरी, सतरंजी , ताडपञी
इतर आदी स्वरूपात मदत केली
तळेगावकर नेहमीच प्रत्येक मदत कार्यात आग्रस्थानी असतात... कोल्हापूर पुरात तळेगावकर नागरिकांनी केलेली मदत कधीही न विसरण्या सारखी गोष्ट आहे...आपल्या गावाची हि मदतीची परंपरा आपण अशीच जपुयात...
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष - किशोरजी आवारे वरील उपक्रम राबण्यात आला होता...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा