मावळ : (सागर शिंदे)
मावळचे निसर्गवैभव टिकवण्यासाठी झाडांची रोपे जमा करून झाडे लावणे किंतु नुसतेच झाड लावून सोडून न देता त्यांची काळजी घेऊन उरलेली रोपे काळजी घेणाऱ्या व्यक्तीस सोपवणे हा उपक्रम नाणे मावळातील तरुणांनी हाती घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत कांबरे व कोंडीवडे परिसरातील डोंगर उतार, माळरान व कोंडेश्वर जांभवली येथे असणाऱ्या वनक्षेत्रातील मोकळ्या जागेवर वृक्षारोपण व बीजरोपण करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, आंबा, कडुलिंब, रिठा, कांचन, बहावा, चिंच, करंज, बांबू, पेरू, फणस, गुलमोहर ई. देशी जातीच्या झाडांचा समावेश होता.
वृक्षारोपण व बीजरोपणासाठी प्रथमेश गायकवाड, मयूर जाधव, ऋतुराज गायकवाड, अभिषेक भांगरे, श्रीहरी कुटे, ओंकार भुंडे, नारायण गायकवाड, अनिकेत गायकवाड,किशोर गायकवाड, कार्तिक गायकवाड, अभिजित लोखंडे, प्रज्वल लोखंडे यांनी पुढाकार घेऊन हे अनमोल कार्य हाती घेतले. भविष्यात या तरुणांचा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व बीजरोपण करण्याचा मानस आहे.
ऑक्सिजन चे महत्व किती आहे याची जाणीव आपल्याला कोरोना म्हणजेच कोविड - १९ ह्या महामारीने करून दिली. ह्या भूतलावर टिकायचे असेल तर झाडे लावणे ही काळाची गरज आहे असे मत ह्या तरुणांनी ह्यावेळी व्यक्त केले.
आपल्या भागातील बातम्यांसाठी येथे संपर्क करा...
9028883534


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा