रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे -शरद पवार

MPN मराठी न्यूज


देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे -शरद पवार


राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या धाडी आणि छापेमारीच्या सत्रावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेब यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडी, सीबीआय अशा यंत्रणांकडून त्रास दिला जात आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागानं अन्य लोकांना त्रास दिला. आता अजितदादा पवार आणि त्यांच्या बहिणींना त्रास दिला जात असल्याचा आरोप शरद पवारसाहेब यांनी केलाय.


महाराष्ट्रातील लोकांची सुख दु:ख समजून घ्यावं हे केंद्र सरकारला सांगण्यासाठी मी जिल्ह्या जिल्ह्यात जात आहे. राज्यात जिथं जाणं शक्य आहे, तिथे जाण्याचा प्रयत्न करणार. एक बातमी पक्की असते की पेट्रोल-डीझेल, गॅसच्या किमती किती वाढल्या. आपल्या भगिनींच्या संसाराचं बजेट कसं कोलमडून पडेल ही बातमीही असतेच. मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा आजचे सत्तेतील लोक आंदोलन करत लोकसभेचं सभागृह बंद पाडत होते. पी. चिदंबरम यांच्या आजच्या लेखात त्यांनी सांगितलं की 25 टक्के कर जरी केंद्र सरकारनं कमी केला तरी किंमत कमी होईल. पण केंद्र सरकार ते करताना दिसत नाही, असंही पवारसाहेब यावेळी म्हणाले





VISIT OUR YOUTUBE CHANNEL https://youtube.com/channel/UCcfidUK_oLKONG77xL3u7vQ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत

MPN मराठी न्यूज मालक भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच ठरु शकतात व आहेत. (मावळ प्रतिनिधी)   शशिकांत चव्हाण मा.सवौच् न्याय...